Posts

ROI

माणूस शेवटपर्यंत हा विद्यार्थीच असतो हे वाक्य रोज अनुभवायला मिळतं. खरंच सोमवारचा दिवस काही तसाच होता. मी आणि माझे सहकर्माचारी ROI म्हणजेच returns on investment म्हणजेच गुंतवणुकीवर परतावा ह्या बद्दल बोलत होतो, की कंपनी नवीन लोकांना नियुक्त करताना त्या व्यक्तीचा ROI विचारात घेऊन मग निर्णय घेते.  खरंतर हा विषय दुपारच्या जेवणाच्या टेबलवरच संपला होता. पण माझ्या मनात वेगळाच विचार सुरू झाला,की return on investment चा विचार आपण आपल्या खाजगी आयुष्यात कधीच करत नाही. पूर्वी म्हण ऐकली आहे जसं पेरता तसं उगवतं पण कदाचित मनुष्याचा अहंकार कधीकधी इतका वाढतो की आपण नक्की काय पेरातोय ह्याकडे दुर्लक्ष होतं.  आपण ऐकतो सकारात्मक विचार करा, ध्यान करा, अहंकार बाजूला ठेवा, ऐकण सोपं आहे पण अमलात आणताना रोज कष्ट घ्यावे लागतात, कारण investment नक्की कश्यात करायची आणि किती करायची ह्याचं गणितंच उलगडत नाही.  काही नात्यांनमध्ये आपण कितीही invest केलं तरी त्याचे returns तेवढे मिळतं नाहीत कारण ते नात तेवढच असतं पण काही नाती आपोआप इतके सुंदर returns देतात की आपल्याला ५% investment पण १००टक्के गोड फळं देऊन ...

होळी रे होळी

आज खूप दिवसांनी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. लिहिण्यासाठी विषय काय निवडायचा हा मोठा प्रश्न असायचा.  खरंय तुमचं विषय सहज मिळाला पाहिजे आणि आज तेच झालं.... अहो, सहज विषय मिळून गेला..   आज सकाळपासून माझ्या लहानपणीच्या मैत्रिणींचे व्हॉट्सॲप वर मेसेज, miss those days, काय मज्जा केलीय ना आपण, रंग लावण्यापासून अगदी समोरच्या बिल्डिंग मधल्या काकूंच्या आमटीत आपण टाकलेला फुगा कसा पडला आणि त्याचा बदला त्या बिल्डिंग मधल्या मुलांनी कसा घेतला.. इथ पर्यंत सगळं आठवलं..  आमची सुरवात होळी दहनाच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता बाहेरच्या नळावर पाण्याचे फुगे भरण्यापासून सुरू व्हायची. मग रात्री सोसायटी मधील होळी ची भेळ खाताना दुसऱ्यादिवशीच नियोजनकरून संपायची.... मुंबईमध्ये धुलीवंदन आणि रंगपंचमी एकच, त्यामुळे सकाळी ९ वाजता रंग लावायला सुरवात करायचो ते थेट दुपारी २ वाजता समोसे खाऊन संपवायचो... सकाळी आपल्या सोसायटीमध्ये रंग खेळून आपल्या मित्रमैत्रिणींच्या सोसायटी मध्ये खेळायला जायचो... रंगलेल्या हाताने गरम गरम समोसे खायची मजा काही वेगळीच होती... त्याचा फायदा कोरोना मध्ये झाला... एवढी प्रतिकारशक...

करिअर घडवताना

Image
प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे.. प्रयत्नांती परमेश्वर... अश्या अनेक म्हणी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. प्रत्येक म्हणीचा मतितार्थ हाच की, प्रयत्न आणि कष्ट केले तरच यश प्राप्ती होते.  एक सामान्य व्यक्ती प्रचंड मेहनत घेत असते, पण तरीही त्या व्यक्तीला पाहिजे तसं मेहनतीचं फळं मिळत नाही आणि मग आपण ताण, नैराश्य, औदासिन्य ह्याला सामोरे जातो. कधीकधी नशिबाला दोष देतो.  खूप पैसा असला तरीही बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की, चार पैसे कमी चालतील पण ही नोकरी नको. मस्करी मध्ये आपण एवढंही म्हणतो की वडापाव विकून पैसे कमवू पण नोकरी, त्याची वेळ, त्यातलं राजकारण नको...पण तेच काही लोकांना आपण त्यांच्या करिअर मध्ये खूप समाधानी बघतो.  नक्की असं काय आहे की ते खुश आहेत पण आपण नाही?  खूप पैसा आला म्हणजे करिअर घडलं असं होतं नाही.  सगळ्यात मह्त्वाचं आहे की ह्या करिअर मधल्या नैराश्याच्या मुळाशी जाणं. जसं भारतीय आयुर्वेदात आपल्या ऋषीमुनींनी सगळ्या त्रासाला मुळापासून उखडून टाकण्यासाठी औषध शोधली अगदी तसचं आपल्याला पण करिअर मधल्या नैराश्याला मुळापासून उखडून टाकायचं आहे.  करिअर घडवत...

शाळेत बाई आणि घरात आई

" हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे." ही प्रार्थना आजच्या काळात आपण फक्त चित्रपटातून ऐकतो. पण ह्याचा खरा अर्थ आमच्या काळात आमच्या मनात रुजवला तो आमच्या शिक्षकांनी, गुरुजनांनी. आयुष्यात कुठल्याही पदावर तुम्ही असाल, जगाच्या पाठीवर कुठेही असाल पण पहिला प्रश्न आपण विचारतो ते म्हणजे ," तू कुठल्या शाळेत होतीस? "  अहो, आपल्या शाळेतील एखादी व्यक्ती आपल्याला भेटली की जणू काही माहेरी गेल्यासारखं वाटतं.. आणि त्यातून तुमचे आई वडील जर शाळेत शिक्षक असतील तर मगं त्या माहेरच्या आठवणी अजूनच मनाला हलवून जातात..  आमच्या बाबतीत असाचं काहीसं झालं. आमची शाळा " पार्ले टिळक विद्यालय." विलेपार्ले मध्ये राहणं म्हणजे जुन्या आणि आधुनिक संस्कृतीला एकत्र हातात हात घालून चालण्यासारखे आहे. त्यातून तुम्ही पार्ले टिळक विद्यालयाचे जर विद्यार्थी असाल तर तुमचा रुबाब काही वेगळाच असतो...   " नावात काय आहे "  असं जरी शेक्सपियर म्हणाले तरी  "पार्ले टिळक विद्यालयाची विद्यार्थिनी " या नावात बरंच काही आहे... २०२० ह्या वर्षावर जरी कोरोनाने हक्क ...

गोरी गोरी पान फुलासारखी छान......

Image
" काय झालं का गाणं म्हणून?"  अहो मी तुम्हालाच विचारत आहे. शिर्षकच असं आहे की गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण.. हे गाणं आपोआप आपण गुणगुणारच.  आपल्या घरातली अशी एक व्यक्ती जिच्या बद्दल आपल्याला लहानपणापासून ओढ निर्माण होते. मगं ती सख्खी वहिनी असेल किंवा चुलत मामे वहिनी , आपल्याला तिची चाहूल हवीहवीशी असते. कारण कुठेतरी आपण तिला मनातूनच बहीण मानलेल असतं.  आपल्याकडे लग्नं ठरल्या दिवसापासून मुलींकडून अपेक्षांना सुरवात होते. ती कुणाचीतरी मामी होते, कुणाचीतरी काकू होते, कुणाचीतरी वहिनी, जाऊ होते.. अशी अनेक नाती तिला सांभाळायची असतात. खूप पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे. बरं बाकीची नाती निभावताना तिला तिचं लग्नाआधीच्या आयुष्याची उणीव भासते.. तिला परत ते आयुष्य जगावस वाटतं.. कारण लग्नाआधी तिच्या आयुष्यात एक मोकळीक असते.  पारंपरिक भाषेत बोलायचं झालं तर नणंद भावजया (वहिनी) ह्यांच्यावर भरपूर किस्से लिहिले जातात. आमची पिढी तर सरळ तिला तिच्या नावाने हाक मारते. मला वाटतं आपण आपल्या घरातल्या सगळ्याच व्यक्तींना बरोबर ओळखत असतो. पण वहिनीने जर का आपल्या घरातल्यांवि...

हक्क - महत्वाचा की नाही?🤔🤔

Image
हक्क ही एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांनाच बजावयची असते. आपल्या भारतीय संस्कृतीत पहिल्यापासूनच हक्क ह्या गोष्टीला खूप महत्वाचं स्थान दिलं जातं. सगळ्यात जास्त महत्व तर खुर्चीवरच्या हक्काला आहे. मग ती खुर्ची राजकारणातली असुदे किंवा बस आणि ट्रेन मधली, ती ज्याला मिळाली ते नशीबवान असतात. बरं त्याच्यामुळे आजूबाजूच्या नात्यांवर काय परिणाम होतील त्याची शाश्वती नाही..  मात्र तोच हक्क तुम्ही एकमेकांवर बजावला तर त्याचे परिणाम खूपच वेगळे असू शकतात. प्रत्येक गोष्टीला जश्या सीमा असतात अगदी तश्याच प्रत्येक नात्यात सुध्दा असतात. मग ते नात बहीण भावांच असेल, मित्र मैत्रिणीच असेल, आई मुलांमधले असेल, बाबा - मुलांमधले असेल, सासू- जावई मधले असेल, सासू - सूनेतल असेल.   आपल्याला वाटतं की असं काही नसतं आणि घरातल्यांशी वागताना कुठल्याच सीमा नाही ठेऊ शकत. सत्य पचवणं आणि मानणं कठीण असतं ते हेच. एरवी आपण पूर्वजन्मी च्या गोष्टी करतो. प्रारब्धाच्या गोष्टी करतो ते मान्य असतं कारण आपल्याला सोयीस्कर वागण्याची सवय झालेली असते.  जर का घराबाहेरच्या व्यक्ती बरोबर तुमचं खूप चांगलं पटतं असेल तर लगे...

आलोय तुमचा निरोप घ्यायला..

Image
अथिती देवो भव.. ही म्हण तुमच्या जगात आहे. निश्चितच मला अशी वागणूक मिळणारच नव्हती. कारण बीनबुलाये मेहमानाच तुम्ही माणसं किती मनापासून स्वागत करता याबद्दल पण ऐकलंय.... मी तर सगळ्यात नावडता पाहुणा.  तुम्ही सगळ्यांनी माझा शोध घेतला. माझ्या विषयी जाणून घेतलं. मी तुमच्या जवळपास पण येऊ नये म्हणून तुम्ही खूप काळजी घेतलीत. माझ्याबद्दल अपशब्द पण उच्चारले.  " काळजी करू नका, मला त्याचा राग नाही आला. मी मान्य करतो की मी चुकलो.  खरंतर तुम्हाला जवळून बघितल्यावर असं जाणवलं की तुम्ही इतकेही वाईट नाही. काहीजणांनी माझ्यासाठी  कविता रचल्या, गाणी गायली. माझ्यासाठी अगदी मंत्र , आरत्या पण रचल्या. तर काहीजणांनी माझ्यावर विनोद केले, माझी चेष्टा केली.  माझ्या जाण्यासाठी जेवढे जमतील तेवढे उपाय केलेत. तुम्हाला मी दिसत नाही याचाही राग आला, पण काय करणार मला रूपच असे दिले. म्हणूनच आता निरोप घ्यायला आलोय कारण मला माहिती आहे, एक दिवस तुम्ही मला नष्ट करण्यात यशस्वी होणार आहात. तुम्ही मान्य करा किंवा नका करू माझ्या येण्याने तुमच्या जीवनशैलीत भरपूर फरक पडला. अहो लहान मुलं तर किती खुश झालेत कारण त्...