Posts

मध्यांतर

मध्यांतर....  आज खूप दिवसांनी नाटक बघण्याचा योग आला. नाटक म्हटलं की त्यातली पात्र, त्यांचे संवाद आणि कथा ही महत्वाची असतात. कलाकार, जे त्या पात्रांना जिवंत करतात, ते त्या नाटकाची उंची एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात.  पहिली घंटा वाजली.... नाट्यगृहात एक वेगळंच वातावरण होतं. सगळे जण आपापल्या जागेवर एका आशेने बसलेले, काही जण त्यांच्यात्यांचात संवाद साधत होते तर काही जण त्यांच्या लहान मुलांना पॉपकॉर्न, वेफर्स असं सगळं देऊन शांत करत होते. काही आजी आजोबा त्या इवल्याश्या प्रकाशात मोबाईल चा आवाज बंद करून द्या हो असं शेजारील व्यक्तींना सांगत होते. एकंदरीत तिसरी घंटा वाजण्याच्या आधीची गडबड , उत्साह, उत्सुकता असं वातावरण होतं आणि तेवढ्यात, कलाकारांना बघण्याची संधी सोड्याची नाही म्हणून साधारण २-३ इंच असलेल्या मानेला अजून किती उंच नेऊ शकतो असा प्रयत्न करणाऱ्या काही व्यक्ती त्यांचा प्रयत्न करत होत्या. अखेर नाटक सुरू झालं....  वेळ आली ती मध्यांतराची... नाटक, चित्रपट बघण्यामागच एक कारण मध्यंतरात तिथे जाऊन समोसा, वडापाव आणि पॉपकॉर्न खाणं हे पण असतंच. सगळे जण पटापट बाहेर कॅन्टीन जवळ गेले. इतकी लोकं म्ह

मोजमाप आधुनिक विचारांचं

मोजमाप आधुनिक विचारांचं....  आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला आणि सगळ्या आकड्यांना किंमत आणली, त्या किंमतीमुळे माणसांना मोजमाप करणं सोप झालं. आयुष्य जगताना मोजमाप हि सगळीकडे करावी लागते. अगदी जेवण बनवताना मीठ घालण्यापासून ते ताटात किती प्रमाणात भाजी असावी , सॅलड किती असावं इथं पर्यंत, घरामध्ये कोणाचं लग्न असेल तर डाएट करायचं म्हणजे तो ड्रेस / लेहंगा आपल्याला सुंदर दिसेल हे पण मोजमाप चर्चेत आहे. तसंच आपल्या घरातील कुटुंबियांना काय सांगायचं किती सांगायचं ह्याच पण मोजमाप होतंच.   बरं त्या मोजमापाची सवय इतकी झालीये कि माणसांच्या वागणुकीवरून, कपड्यांवरून ठरवतात कि लोकं आधुनिक आहेत कि जुन्या विचारांची.. कपड्यांवरून , ड्रिंक्स केला म्हणून समोरचा व्यक्ती आधुनिक आहे हि व्याख्याच चुकीची आहे. ड्रिंक्स घेणं, कुठले ब्रँडेड कपडे घालायचे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे आणि हे प्रमाण नाही माणसंच मोजमाप करायचं.  पालक जेव्हा मुलांना शिकवणी ला पाठवतात, शाळेत पाठवतात तेव्हा मार्क्स वरून मोजमाप केलं जातं. बऱ्याचदा मुलांना concept किती समजली ते मोजमाप गरजेचं वाटत नाही. कारण प्रमाण मार्क्स दाखवत. पण जी मुलं slo

The Millennials

पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धत म्हणजे पुढच्या नवीन पिढीला नावं ठेवणं होय. मग ती नावं उद्धार करण्यासाठी असूदे किंवा कौतुक करण्यासाठी असुदे. हल्ली कानावर पडणाऱ्या पिढ्यांची नावं म्हणजे GenZ, Gen Alpha आणि The Millennials.. एकमेकांना नावं ठेवण्यापेक्षा पिढ्यांना नावं ठेवणं सोप्पं आहे.  बरं ज्यांना माहीत नाही त्यांच्या साठी Millennials म्हणजे १९८१-१९९६ ह्या वर्षात जन्मलेली मुले. GenZ म्हणजे १९९७-२०१२ ह्या वर्षात जन्मलेली मुले आणि Gen Alpha म्हणजे २०१३-२०२५ ह्या वर्षांत जन्मलेली मुले. असा हा सध्या विषय (Trend) चालू आहे.   प्रत्येक पिढी ही नवीन संस्कार आणि जीवनमूल्ये निर्माण करत असते जी त्या वयाला आणि त्या काळाला अनुरूप असतात. पण सध्या बहुचर्चित असलेली पिढी ही Millennials ची आहे. कारण आमच्या डोक्यावर एक हात जुनं ते सोनं ह्यांचा आहे तर आमच्या हातात हात please stop being an old schooler ह्यांचा आहे.. आणि ह्या दोन्ही पिढ्यांमध्ये जवळपास ६० - ७० वर्षांच अंतर आहे.    बरं, millennials ना त्यांची मत मांडणं कधी कधी इतकं कठीण होतं कारण तो समतोल साधताना त्यांच्यावर बाकीच्या दोन पिढ्यांची जबाबदारी असते

ROI

माणूस शेवटपर्यंत हा विद्यार्थीच असतो हे वाक्य रोज अनुभवायला मिळतं. खरंच सोमवारचा दिवस काही तसाच होता. मी आणि माझे सहकर्माचारी ROI म्हणजेच returns on investment म्हणजेच गुंतवणुकीवर परतावा ह्या बद्दल बोलत होतो, की कंपनी नवीन लोकांना नियुक्त करताना त्या व्यक्तीचा ROI विचारात घेऊन मग निर्णय घेते.  खरंतर हा विषय दुपारच्या जेवणाच्या टेबलवरच संपला होता. पण माझ्या मनात वेगळाच विचार सुरू झाला,की return on investment चा विचार आपण आपल्या खाजगी आयुष्यात कधीच करत नाही. पूर्वी म्हण ऐकली आहे जसं पेरता तसं उगवतं पण कदाचित मनुष्याचा अहंकार कधीकधी इतका वाढतो की आपण नक्की काय पेरातोय ह्याकडे दुर्लक्ष होतं.  आपण ऐकतो सकारात्मक विचार करा, ध्यान करा, अहंकार बाजूला ठेवा, ऐकण सोपं आहे पण अमलात आणताना रोज कष्ट घ्यावे लागतात, कारण investment नक्की कश्यात करायची आणि किती करायची ह्याचं गणितंच उलगडत नाही.  काही नात्यांनमध्ये आपण कितीही invest केलं तरी त्याचे returns तेवढे मिळतं नाहीत कारण ते नात तेवढच असतं पण काही नाती आपोआप इतके सुंदर returns देतात की आपल्याला ५% investment पण १००टक्के गोड फळं देऊन जातात. अगदी तस

होळी रे होळी

आज खूप दिवसांनी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. लिहिण्यासाठी विषय काय निवडायचा हा मोठा प्रश्न असायचा.  खरंय तुमचं विषय सहज मिळाला पाहिजे आणि आज तेच झालं.... अहो, सहज विषय मिळून गेला..   आज सकाळपासून माझ्या लहानपणीच्या मैत्रिणींचे व्हॉट्सॲप वर मेसेज, miss those days, काय मज्जा केलीय ना आपण, रंग लावण्यापासून अगदी समोरच्या बिल्डिंग मधल्या काकूंच्या आमटीत आपण टाकलेला फुगा कसा पडला आणि त्याचा बदला त्या बिल्डिंग मधल्या मुलांनी कसा घेतला.. इथ पर्यंत सगळं आठवलं..  आमची सुरवात होळी दहनाच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता बाहेरच्या नळावर पाण्याचे फुगे भरण्यापासून सुरू व्हायची. मग रात्री सोसायटी मधील होळी ची भेळ खाताना दुसऱ्यादिवशीच नियोजनकरून संपायची.... मुंबईमध्ये धुलीवंदन आणि रंगपंचमी एकच, त्यामुळे सकाळी ९ वाजता रंग लावायला सुरवात करायचो ते थेट दुपारी २ वाजता समोसे खाऊन संपवायचो... सकाळी आपल्या सोसायटीमध्ये रंग खेळून आपल्या मित्रमैत्रिणींच्या सोसायटी मध्ये खेळायला जायचो... रंगलेल्या हाताने गरम गरम समोसे खायची मजा काही वेगळीच होती... त्याचा फायदा कोरोना मध्ये झाला... एवढी प्रतिकारशक्ती वाढली म्हणून सा

करिअर घडवताना

Image
प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे.. प्रयत्नांती परमेश्वर... अश्या अनेक म्हणी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. प्रत्येक म्हणीचा मतितार्थ हाच की, प्रयत्न आणि कष्ट केले तरच यश प्राप्ती होते.  एक सामान्य व्यक्ती प्रचंड मेहनत घेत असते, पण तरीही त्या व्यक्तीला पाहिजे तसं मेहनतीचं फळं मिळत नाही आणि मग आपण ताण, नैराश्य, औदासिन्य ह्याला सामोरे जातो. कधीकधी नशिबाला दोष देतो.  खूप पैसा असला तरीही बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की, चार पैसे कमी चालतील पण ही नोकरी नको. मस्करी मध्ये आपण एवढंही म्हणतो की वडापाव विकून पैसे कमवू पण नोकरी, त्याची वेळ, त्यातलं राजकारण नको...पण तेच काही लोकांना आपण त्यांच्या करिअर मध्ये खूप समाधानी बघतो.  नक्की असं काय आहे की ते खुश आहेत पण आपण नाही?  खूप पैसा आला म्हणजे करिअर घडलं असं होतं नाही.  सगळ्यात मह्त्वाचं आहे की ह्या करिअर मधल्या नैराश्याच्या मुळाशी जाणं. जसं भारतीय आयुर्वेदात आपल्या ऋषीमुनींनी सगळ्या त्रासाला मुळापासून उखडून टाकण्यासाठी औषध शोधली अगदी तसचं आपल्याला पण करिअर मधल्या नैराश्याला मुळापासून उखडून टाकायचं आहे.  करिअर घडवताना जसं शिक्षण महत्वाचं आहे अ

शाळेत बाई आणि घरात आई

" हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे." ही प्रार्थना आजच्या काळात आपण फक्त चित्रपटातून ऐकतो. पण ह्याचा खरा अर्थ आमच्या काळात आमच्या मनात रुजवला तो आमच्या शिक्षकांनी, गुरुजनांनी. आयुष्यात कुठल्याही पदावर तुम्ही असाल, जगाच्या पाठीवर कुठेही असाल पण पहिला प्रश्न आपण विचारतो ते म्हणजे ," तू कुठल्या शाळेत होतीस? "  अहो, आपल्या शाळेतील एखादी व्यक्ती आपल्याला भेटली की जणू काही माहेरी गेल्यासारखं वाटतं.. आणि त्यातून तुमचे आई वडील जर शाळेत शिक्षक असतील तर मगं त्या माहेरच्या आठवणी अजूनच मनाला हलवून जातात..  आमच्या बाबतीत असाचं काहीसं झालं. आमची शाळा " पार्ले टिळक विद्यालय." विलेपार्ले मध्ये राहणं म्हणजे जुन्या आणि आधुनिक संस्कृतीला एकत्र हातात हात घालून चालण्यासारखे आहे. त्यातून तुम्ही पार्ले टिळक विद्यालयाचे जर विद्यार्थी असाल तर तुमचा रुबाब काही वेगळाच असतो...   " नावात काय आहे "  असं जरी शेक्सपियर म्हणाले तरी  "पार्ले टिळक विद्यालयाची विद्यार्थिनी " या नावात बरंच काही आहे... २०२० ह्या वर्षावर जरी कोरोनाने हक्क