Posts

चाळिशीतला - दुसरा अंक...

चाळीशीतला - दुसरा अंक...  सध्या मराठी नाटकांना खूप मोठ्या संख्येने गर्दी होतं आहे. बरं आजकाल नाटकं सुद्धा दोन अंकी असतात. फार क्वचित तीन अंकी नाटक होतं असेल. हाऊसफुल चा बोर्ड बऱ्याच नाट्यगृहात पाहायला मिळतो कारण हल्लीच्या नाटकांचे विषय हे प्रामुख्याने सध्याच्या काळाला अनुसरून असतात.  काही महिन्यांपूर्वी अतुल सुभाष ह्यांच्या आत्महत्येने पूर्ण देशाला हलवून सोडलं होतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या आजूबाजूला सुद्धा १९७०-१९८८ मधले कितीतरी जणं आहेत जे स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही जणं यशस्वी झाली आहेत, मग ते त्यांच्या करीअर मध्ये असेल किंवा खाजगी आयुष्यात असेल पण असे बरेच जण आहेत ज्यांना अजूनही झुंज द्यावी लागत आहे. स्वतः पेक्षा कमी वयाच्या मुलांना आपला बॉस म्हणून बघणं आणि राजकारण सहन करणे तेही त्यांच्यापेक्षा कमी पगारात, हे कठीण आहे.  GenZ ना मिळणारा पगार आणि त्या तुलनेत ह्यांना मिळणारा पगार ह्यामध्ये खूप तफावत आढळते.  दुर्दैवाची गोष्ट म्हणजे १९७०-१९८८ मधल्या मुलांना नेहमीच तुलनेला सामोरं जावं लागतं. ओळखीतल्या लोकांना हे बोलणं खूप सोपं आहे, की चाळ...

गुरु - सगुण रुपात

गुरु - सगुण रुपात की निर्गुण रुपात?  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला उणीव भासते ती एका अश्या व्यक्तीची जी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत धीर देईल. एक अशी व्यक्ती जिच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो आणि निश्चिंत होतो.. एक अशी व्यक्ती जी आपल्याला मार्गदर्शन करेल... बरं ही उणीव अगदी लहान असल्यापासून आपल्याला भासते. उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी आपल्याला आई बाबांच्या ओरडण्यापासून वाचविणारे काका काकू असतील किंवा आजी आजोबा असतील किंवा ताई दादा असेल. आपल्याला ती व्यक्ती जणू काही एक आधारस्तंभ वाटायला लागतो.  शाळेमध्ये आपले मित्रमैत्रिणी आपले आधारस्तंभ होतात. तसं बघितलं तर प्रत्येक टप्प्यात आपल्याला आधाराची गरज असते. मगं अश्या एक किंवा अनेक व्यक्ती असतील. जसजसं आपण मोठे होतं जातो तसतसं आपण अनुभव घेत, व्यक्तींचे अनुभवांच्या अनुषंगाने द्विभाजन करत जातो.   मनुष्याचे संपूर्ण आयुष्य नेमका खरा गुरू कोण हे ओळखण्यात जातो. गुरू ची परिभाषा, त्यांचं वर्णन म्हणजे केशरी रंगाचा पोशाख, रुद्राक्षाच्या माळा, मस्तकी भस्म किंवा अंगारा आणि नेहमीच सकारात्मकतेने मार्गदर्शन करणारे अशी व्य...

सेम पेज

" हम तुम " हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. कारण त्यामधला एक लोकप्रिय संवाद की, "हर किसी की कोई ना कोई कहानी होती हैं" | हा सगळ्यात जास्त मला मनाला आवडला..काही नाती आयुष्यभरासाठी टिकतात तर काही एका दिवसात संपतात...  ह्याचाच अर्थ त्या नात्यांमधल पुस्तकं हे छोटं किंवा मोठं असू शकतं. " वाचाल तर वाचाल " ही म्हण आपण सगळेच लहानपणापासूनच ऐकत आलोय. मगं ते वाचन पुस्तकांचं असेल किंवा आयुष्यात येणाऱ्या नात्यांचं. सगळ्यात महत्वाचं आहे की आपण सेम पेजवर असण. कारण जसं आपण म्हणतो की पुस्तकांचं वाचन करताना तुम्ही जर ते टप्प्यात केलं तर दुसऱ्यादिवशी तुम्हाला संदर्भ लागला पाहिजे. अगदी तसचं नात्यात पण आपण काल ज्या पानावर होतो तिथूनच पुढे दोघांनी सेम पेजवर असण महत्वाचं आहे. कितीही झाल तरी पुस्तकात आपण एखादी निर्जीव वस्तू खूण म्हणून ठेवु शकतो, जी आपल्याला दुसऱ्या दिवशी काल शेवट कुठे केला ते दाखवते. पण नात्यांचं तसं नाहीये कारण काल शेवट कुठे केला हे आपलच आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तिथून पुढे सुरवात करताना त्या दोन व्यक्ती सेम पेजवर असण  गरजेचं आहे.  मगं ते नातं नवरा बायकोच अस...

अ. वि. उ. वि.

 अ. वि. उ. वि  कितीही सरळ जायचं ठरवलं तरी "विचार" ही अशी गोष्ट आहे जी समोरच्याला द्विधा मनस्थितीत टाकते. सरळ जाणाऱ्याला वाकडी तिकडी वाट घ्यायला भाग पाडते.  "विचार" येताना एकटेच येतात. आपण त्याला विशेषण देतो, "अति विचार आणि"उगाच" विचार आणि सगळं बदलून जातं. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येत असतात की एक छोटीशी गोष्ट असते पण आपण त्याला खूप मोठ् रूप देतो.  सगळेच विचार हे शुल्लक नसतात. काही विचार इतिहास घडवून गेले आहेत.  विचारांवर विजय मिळवणे हे प्रत्येकाला शक्य असते पण तो विजय मिळवताना वेळ किती लागेल हे स्वतः ला निश्चित करावे लागतो. लहान मुलं असुदे किंवा मोठी व्यक्ती असुदे, नेहमीच आपण ऐकत आलोय की उगाच विचार करत बसू नकोस. अति विचार करत बसू नकोस. बऱ्याच वेळेला आपली तंद्री लागलेली असते आणि तेवढ्यात कोणी तरी आपल्याला विचलित करते.   असं म्हणतात की माणसाचा मेंदू एका मिनिटात ३८-४५ विचार निर्माण करते म्हणजे दिवसभरात सुमारे ५००००-७०००० विचार. ( Google वर मिळालेला नंबर ) एवढं नक्की की आकडा खूप मोठा आहे. पण सगळ्याच विचारांकडे आपण लक्ष देत नाही. कधीकधी विचारांमध्य...

अशी आई नको ग बाई !!

अशी आई नको ग बाई !! "आई" हा एक शब्द खूप काही सांगून जातो. बाळाला जन्म देण्यासाठी सोसलेल्या कळांपासून ते मुलाला / मुलीला स्वतःच्या पायावर उभे करे पर्यंत घेतलेले कष्ट, आनंद,त्याग सगळंच....  लहानपणी आईशिवाय पान हलत नाही.. मुलांसाठी चांगलं जेवण बनवणं, खेळवण, चांगले संस्कार करणे, वाईट गोष्टींपासून दूर ठेवणे.. जसं जसं मुलं मोठी होतं जातात तसं तसं शाळेचा अभ्यास, पालकसभेला हाजिर राहणं.. आणि एवढं सगळं करून सुध्दा शाळेतून येणाऱ्या सूचना की मुलांकडे लक्ष द्या आणि बरच काही... अश्या अनेक गोष्टी आई सांभाळत असते.  एकीकडे मुलांना शिस्त लावताना स्वतः वाईटपणा घेणं आणि दुसरीकडे घरातल्यांचे विचार मुलांना पटवून द्यायची तडजोड करणं.. घरात कोणाचीही भांडण झाली , अबोला धरला तर "आई" त्यांच्यातल्या संभाषणाचा दुवा असते.  मुलं मोठी होत असताना ती तीच जगणं विसरून जाते... सगळं असून सुध्दा काहीच नसल्याच्या भावना तिला येतात.. पिढ्यांमधलं अंतर आणि विचार खूप जवळून अनुभवणारी, पण काही ठिकाणी हतबल असणारी व्यक्ती म्हणजे "आई".  एक दिवस असा येतो, की जेव्हा आजूबाजूची लोकं म्हणायला लागतात," सोळा...

टाईम प्लीज

टाईम प्लीज... खेळ असुदे किंवा भांडण, वाद विवाद आपला मुद्दा मांडण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे "टाईम प्लीज" म्हणायचं.. नुसतं म्हणायचं नाही तर हाताची मूठ करून ती आपल्या ओठांना लावायची आणि मगच म्हणायचं. इतका दृढ विश्वास होता त्या एका शब्दावर की जणू खरंच वाटायचं साक्षात परमेश्वर सुद्धा आपल्यासाठी तो क्षण धरून ठेवतोय...  लहानपणीचं "टाईम प्लीज" आपल्या आयुष्यात इतक्या आठवणी देऊन जातात, की कधीकधी वाटतं मोठं झाल्यावर हा उपाय रोजच्या आयुष्यात इतक्या सहज वापरायला मिळाला तर जगणं किती सोप्पं होईल.  खरंच असा संवाद साधता आला तर..... भक्त - आहे का वेळ? जरा बोलायचं..  देव - वेळच वेळ आहे ..ये भेटायला....  भक्त -  ( मित्र मैत्रिणींनबरोबर गप्पा चालू होत्या.) तेवढ्यात देवाचं बोलावणं आलं आणि पटकन मुखातून आलं, ए " टाईम प्लीज" हा,.आलोच जरा....  असं म्हणून देवासमोर चर्चा सुरू होणार तेवढ्यात,  देवं म्हणाले कि तू जर सगळ्यांच्या तक्रार करणार असशील तर मी त्या रोज ऐकतो... परत तेच नको..  भक्त -  अरे यार, ह्याला काय अर्थ आहे..म्हणजे खाली कोणाशी बोलू शकत नाही... आणि एवढं " टाईम ...

मध्यांतर

मध्यांतर....  आज खूप दिवसांनी नाटक बघण्याचा योग आला. नाटक म्हटलं की त्यातली पात्र, त्यांचे संवाद आणि कथा ही महत्वाची असतात. कलाकार, जे त्या पात्रांना जिवंत करतात, ते त्या नाटकाची उंची एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात.  पहिली घंटा वाजली.... नाट्यगृहात एक वेगळंच वातावरण होतं. सगळे जण आपापल्या जागेवर एका आशेने बसलेले, काही जण त्यांच्यात्यांचात संवाद साधत होते तर काही जण त्यांच्या लहान मुलांना पॉपकॉर्न, वेफर्स असं सगळं देऊन शांत करत होते. काही आजी आजोबा त्या इवल्याश्या प्रकाशात मोबाईल चा आवाज बंद करून द्या हो असं शेजारील व्यक्तींना सांगत होते. एकंदरीत तिसरी घंटा वाजण्याच्या आधीची गडबड , उत्साह, उत्सुकता असं वातावरण होतं आणि तेवढ्यात, कलाकारांना बघण्याची संधी सोड्याची नाही म्हणून साधारण २-३ इंच असलेल्या मानेला अजून किती उंच नेऊ शकतो असा प्रयत्न करणाऱ्या काही व्यक्ती त्यांचा प्रयत्न करत होत्या. अखेर नाटक सुरू झालं....  वेळ आली ती मध्यांतराची... नाटक, चित्रपट बघण्यामागच एक कारण मध्यंतरात तिथे जाऊन समोसा, वडापाव आणि पॉपकॉर्न खाणं हे पण असतंच. सगळे जण पटापट बाहेर कॅन्टीन जवळ गेले....