Posts

Showing posts from May, 2020

संवाद - पिढ्यांचा

Image
संवाद, एका मनाचा दुसऱ्या मनाशी.... किंवा आधुनिक पिढीचा पूर्वीच्या पिढीशी....  आता म्हणाल हे काय नवीनच आहे बुआ... आम्ही नाही हो कधी असा संवाद केला आमच्या पूर्वजांबरोबर .... बरोबर आहे तुम्ही तो संवाद केला नाहीत म्हणून आमच्या (आधुनिक) पिढीला करायला लागतोय.... अहो कारणच तसं आहे. बरं एक कारण असेल तर ठीक , इथे भरपूर कारणं आहेत. तुम्हाला आधुनिक पिढीचे विचार आवडतं नाहीत, त्यातून आधुनिक काळातल्या मुलींचे विचार तर नक्कीच खटकतात. आत्ताच्या मुलींचे राहणीमान, त्यांचं बेधडक मनाला येईल ते बोलणं, जिथे चूक आहे तिथे स्पष्ट बोलणं ह्या सगळ्या गोष्टी तर फारच खटकतात..  आता मला सांगा तुमची पिढी (पूर्वीची) जुन्या रुढी परंपरा पाळणारी.  त्यातून तुमच्या पिढीमध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव जास्त होता. तुमची पिढी ते सगळं सहन पण करायची. आणि त्याचा आदर आमच्या पिढीला (आधुनिक) नक्कीच आहे. आपण जसं म्हणतो की मनावर हात ठेवून खर सांग, अगदी तसं तुम्ही खरंच मनावर हात ठेऊन सांगा की त्या काळी कधीच तुम्ही मनातल्या मनात तुम्हाला त्रास करून नाही घेतलात का? कधीच तुम्हाला असं नाही का वाटलं की माझ्या मुलांना मला पाहिजे तसं वाढव

संस्कारांच ओझं - चांगले की वाईट ?

Image
काल संध्याकाळी अचानक माझ्या मैत्रिणीचा फोन मला आला.. म्हणाली की "अगं मला माझ्या मुलांवराती चांगले संस्कार करायचेत. तुझ्या ओळखीत कुठे आहेत का ग संस्कार वर्ग? म्हणजे कसं त्याला योग्य वळणं मिळालंच पाहिजे." " माझ्या ओळखीत असतील तर मी सांगते तुला ", असं म्हणून मी फोन ठेवून दिला... मला एक क्षण सुचेनास झालं. एक मोठं ब्रम्हांड त्यामध्ये आपली पृथ्वी आणि त्या पृथ्वीवर राहणारी आपण माणसं. पण माणसाला कोण घडवत तर त्याच्यावर होणारे संस्कार आणि आजूबाजूचा समाज...  आपल्याकडे दोन भिन्न स्वभावाची माणसं आहेत... काहीजण समाज काय म्हणेल हा  विचार करून मुलांवरती संस्कार करतात तर काहीजण संस्कार करताना आवर्जून सांगतात की समाजाचा विचार करतं बसू नकोस... बरं म्हणजे दोनही  स्वभावांची माणसं चुकीची होतात का? तर नाही... कारण त्या भिन्न स्वभावांच्या माणसांवर तसे संस्कार झालेले असतात.. निष्कर्ष काढायचा झाला तर, समाज सुध्दा संस्कारांमुळे बनतो.. संस्कार कधीच जबरदस्तीने होतं नाहीत. नीट विचार केला तर आपल्याला कळेल की पूर्वीच्या पिढी मध्ये आणि आत्ताच्या पिढीमध्ये काय फरक आहे ते. पूर्वीच्या पिढी

आई, बाबा आणि भांडण

Image
 " काय रे आदि , काय झालं? तू इतका disturb का झालास? भांडण झालंय का कोणाबरोबर?  "  अरे बोल बाळा ."  (नंतर जे आदि ने मला सांगितलं , ते ऐकल्यावर मला आदि चं खुपचं वाईट वाटलं. )  आदि च्या घरी त्याच्या आई बाबांचं भांडण झालं होतं आणि त्यामुळे आदि प्रचंड मानसिक दृष्ट्या त्रासलेला होता.  काही जणांना वाटतं की, ह्यात नवीन काहीच नाही हे तर घरोघरी घडतं असतं. आपण मोठी माणसं काही वेळाने भांडण विसरून जातो आणि वेगळ्या कामात व्यस्त होऊन जातो. वयानुसार आणि अनुभवामुळे आपल्याला हे बदल स्वीकारणे सोप्पे होते. पण लहान मुलांचं तसं नसतं... त्यांचं वय लहान असतं आणि अनुभवाने सुध्दा ते लहान असतात त्यामुळे त्यांना हे बदल स्वीकारणं कठीण होतं.. अहो लहान मुलं ती , आपण जसे अनुभवातून शिकत मोठे झालो अगदी तसचं त्यांचं आहे. पण आपण हे विसरतो की त्या भांडणाचा त्या लहान मुलांच्या मनावर किती परिणाम होतो ते...   भांडण सुरू झालं तर आपला राग आपण मुलांवर काढतो. त्यांची चूक नसताना त्यांच्यावर आपण ओरडतो, फटके देतो. बरं ह्या सगळ्यात मुलांची चूक काय?   नीट विचार करा, एका आई च्या पोटी जन्माला येणारी जुळी मुलं

नात्यातल्या प्रश्नाचं वळण...

Image
आई, सांग ना मला की मी कुठून आले. मला Santa Claus ने सोडलं का? सांग ना यार...  हा एक प्रश्न असा आहे ज्याच उत्तर दिल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. एकवेळ बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं देण्यात सुट मिळेल. पण ह्या प्रश्नापासून कधीच नाही.  बरं त्यातून जर का तुम्हाला मोठी मुलगी किंव्हा मुलगा असेल तर दुसरं मुलं नक्कीच अजून विचित्र प्रश्न विचारणार. साधारण बोलायचं झाल तर, आई मला अनाथाश्रमातून आणलाय का? की मला रस्त्यावरून आणलाय? सांग ना.... ताई/दादा म्हणत होता/होती की मला कोणीच घेऊन जायला तयार नव्हतं म्हणून आई बाबा नी तुला उचलून आणलं. 😂😂🙈 हे विचारताना मुलांच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा बघण्यासारखा असतो... एवढं सहायला येतं त्यांच्याकडे बघितल्यावर....हे तर एक उदाहरणं झालं.... पण असे असंख्य प्रश्न मुलांच्या मनात असतात..  खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे..  बऱ्याच पालकांना वाटतं की त्यांचं हे वय नाही ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं... बरं आपण नाही सांगितलं म्हणून त्यांना कळणार नाही असं आहे का? त्यापेक्षा आपणच योग्य प्रकारे माहिती दिली तर काय वाईट आहे? उलट त्यांच्या वयाल

मोठ्ठा शून्य

Image
मोठ्ठा शून्य....   "अरे hi, तुला एक सांगायचं होतं माझ्या बहिणीला काल मुलगी झाली. खूप खुश आहेत सगळे... काय धमाल यार. मी तर ठरवलं सुध्दा की तिला कुठल्या शाळेत घालायचं. मी ताई ला सांगणार आहे की तिला आयुष्यात जे बनायचंय ते बनुदे. अगं आणि माझ्या ताई ने पण ठरवलंय की तिला तिच्या प्रमाणे आयुष्य जगू देणारं मी.... मी माझ्या मैत्रिणीच हे सगळं ऐकून घेतलं, तिच आणि तिच्या बहिणींचं अभिनंदन केलं.अग मात्र बराच वेळ विचार करत बसले की खरंच आपल्याला नक्की कोण घडवत? आपले विचार की समाजाचे विचार...  हा खुपचं खोल विषय आहे. म्हणजे साधारण पणे एखाद्या मनुष्याच आयुष्य जगण्याचा साचा हा ठरलेला असतो... हा थोडा फरक असतो पण सर्व सामान्य माणूस त्या ठरलेल्या साच्यातूनच जातो. म्हणजे बघा ना, लहानपणी आपण मुलांना सांगतो की अरे तुला फक्त दहावी पर्यंत अभ्यास करायचंय मग काय तू मोकळाच.... नंतर कॉलेज मध्ये आपण म्हणतो की अरे फक्त बारावी आणि फायनल इअर बस मग तू मोकळाच.....  हे सगळं सांगताना आपण एक गोष्ट विसरतो किंव्हा त्याकडे नकळत दुर्लक्ष होतं ते म्हणजे की तुला घडत असताना मानसिक दृष्ट्या स्वतः ला सांभाळता आलं पाहिज

मुलं म्हणजे देवाघरची फुलं

Image
मुलं म्हणजे देवाघरची फुलं  मुलं म्हणजे देवाघरची फुलं हि म्हणं आपण खूप पूर्वी पासून ऐकत आलोय. बऱ्याच पालकांचं असं  म्हणणं असतं कि , मुलं लहान असताना हि म्हणं योग्य आहे पण मोठी झाल्यावर अजिबात नाही. पूर्वी हि म्हणं साधारण मुलं १०-१२ वर्षांची होई पर्यंत स्वीकारली जायची. पण हल्लीच्या काळात मुलं ३-४ वर्षाचं झालं कि, हि म्हणं स्वीकारणं कठीण होतं . जेवढ्या प्रमाणात आपण नवीन टेकनॉलॉजिला सहजरित्या स्वीकारतो तेवढ्याच सहजरित्या मुलानंमध्ये बदलत जाणाऱ्या गोष्टींना पण स्वीकारता आलं पाहिजे. बरं साधारण पणे १० वर्षांच्या पुढच्या मुलांना त्यांच्या मध्ये बदलत जाणाऱ्या गोष्टींना स्वीकारणं थोडं सोप्पं होतं. कारण त्या मुलांना कमीतकमी एवढं तरी कळतं कि त्यांच्यामध्ये काहीतरी बदल होतं आहेत. मात्र ०-८/९ ह्या वयोगटातली जी मुलं असतात त्यांना स्वतःला त्यांच्यात बदल होत आहे हे समजायला वेळ लागतो. विशेष म्हणजे ०-५ ह्या वयोगटात मुलं पूर्णपणे आई बाबा वर अवलंबून असतात.  बरं  हा बदल नुसता मुलांमध्ये दिसतो का तर नाही. जेंव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा आपला सुद्धा आई बाबा म्हणून जन्म होतो. खरतर हा बदल एक परिवार

लग्नाच्या वादिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Image
ती : उद्या काय आहे माहितेय ना?😊🤔😊 तो : असं कसं विसरेन. १ मे २०१३ ला कामगार दिन साजरा केला तो शेवटचा... २ मे २०१३ पासून तर मला कामगार दिनाची पण सुट्टी नाही मिळाली..... ती : म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी तुला कामाला लावते? बोल ना ... आता का गप्प?? मी काहीच कामं करत नाही असं वाटतं तुला? हे बरं आहे म्हणजे सगळी घराची कामं पण करा आणि तुझं बोलणं पण ऐका...  तो : थांब जरा.... किती बोलतेस... मी काय बोलतोय , तू काय बोलतेय.... अगं मला असं म्हणायचं होतं की .... ती : तू तर काही बोलूच नकोस... कळलं ना... तुला जशी कामगार दिनाची सुट्टी मिळाली नाही ना तशीच मला पण नाही मिळाली.... आई कडे असताना किती आरामात असायचे मी.... तो : असो.... चला विषय बदला.... " हळूच पुटपुटला "  ( ह्या मुली कुठलाही विषय कुठेही नेऊ शकतात... कठीण आहे )  ती : काय म्हणालास? कठीण आहे?  तो : lockdown चं कठीण आहे असं मी म्हणालो.... तुला असं बोलेन का कधी.... माझी काय बिशाद तुला काही बोलायची...... मला रहायचंय...  ती : मला रहायचंय म्हणजे? तू प्लीज नीट बोल माझ्याशी कळलं ना....  तो : 🙏🙏 ओके , तू जिंकलीस आणि मी.... त