Posts

Showing posts from 2024

गुरु - सगुण रुपात

गुरु - सगुण रुपात की निर्गुण रुपात?  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला उणीव भासते ती एका अश्या व्यक्तीची जी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत धीर देईल. एक अशी व्यक्ती जिच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो आणि निश्चिंत होतो.. एक अशी व्यक्ती जी आपल्याला मार्गदर्शन करेल... बरं ही उणीव अगदी लहान असल्यापासून आपल्याला भासते. उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी आपल्याला आई बाबांच्या ओरडण्यापासून वाचविणारे काका काकू असतील किंवा आजी आजोबा असतील किंवा ताई दादा असेल. आपल्याला ती व्यक्ती जणू काही एक आधारस्तंभ वाटायला लागतो.  शाळेमध्ये आपले मित्रमैत्रिणी आपले आधारस्तंभ होतात. तसं बघितलं तर प्रत्येक टप्प्यात आपल्याला आधाराची गरज असते. मगं अश्या एक किंवा अनेक व्यक्ती असतील. जसजसं आपण मोठे होतं जातो तसतसं आपण अनुभव घेत, व्यक्तींचे अनुभवांच्या अनुषंगाने द्विभाजन करत जातो.   मनुष्याचे संपूर्ण आयुष्य नेमका खरा गुरू कोण हे ओळखण्यात जातो. गुरू ची परिभाषा, त्यांचं वर्णन म्हणजे केशरी रंगाचा पोशाख, रुद्राक्षाच्या माळा, मस्तकी भस्म किंवा अंगारा आणि नेहमीच सकारात्मकतेने मार्गदर्शन करणारे अशी व्य...

सेम पेज

" हम तुम " हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. कारण त्यामधला एक लोकप्रिय संवाद की, "हर किसी की कोई ना कोई कहानी होती हैं" | हा सगळ्यात जास्त मला मनाला आवडला..काही नाती आयुष्यभरासाठी टिकतात तर काही एका दिवसात संपतात...  ह्याचाच अर्थ त्या नात्यांमधल पुस्तकं हे छोटं किंवा मोठं असू शकतं. " वाचाल तर वाचाल " ही म्हण आपण सगळेच लहानपणापासूनच ऐकत आलोय. मगं ते वाचन पुस्तकांचं असेल किंवा आयुष्यात येणाऱ्या नात्यांचं. सगळ्यात महत्वाचं आहे की आपण सेम पेजवर असण. कारण जसं आपण म्हणतो की पुस्तकांचं वाचन करताना तुम्ही जर ते टप्प्यात केलं तर दुसऱ्यादिवशी तुम्हाला संदर्भ लागला पाहिजे. अगदी तसचं नात्यात पण आपण काल ज्या पानावर होतो तिथूनच पुढे दोघांनी सेम पेजवर असण महत्वाचं आहे. कितीही झाल तरी पुस्तकात आपण एखादी निर्जीव वस्तू खूण म्हणून ठेवु शकतो, जी आपल्याला दुसऱ्या दिवशी काल शेवट कुठे केला ते दाखवते. पण नात्यांचं तसं नाहीये कारण काल शेवट कुठे केला हे आपलच आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तिथून पुढे सुरवात करताना त्या दोन व्यक्ती सेम पेजवर असण  गरजेचं आहे.  मगं ते नातं नवरा बायकोच अस...

अ. वि. उ. वि.

 अ. वि. उ. वि  कितीही सरळ जायचं ठरवलं तरी "विचार" ही अशी गोष्ट आहे जी समोरच्याला द्विधा मनस्थितीत टाकते. सरळ जाणाऱ्याला वाकडी तिकडी वाट घ्यायला भाग पाडते.  "विचार" येताना एकटेच येतात. आपण त्याला विशेषण देतो, "अति विचार आणि"उगाच" विचार आणि सगळं बदलून जातं. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येत असतात की एक छोटीशी गोष्ट असते पण आपण त्याला खूप मोठ् रूप देतो.  सगळेच विचार हे शुल्लक नसतात. काही विचार इतिहास घडवून गेले आहेत.  विचारांवर विजय मिळवणे हे प्रत्येकाला शक्य असते पण तो विजय मिळवताना वेळ किती लागेल हे स्वतः ला निश्चित करावे लागतो. लहान मुलं असुदे किंवा मोठी व्यक्ती असुदे, नेहमीच आपण ऐकत आलोय की उगाच विचार करत बसू नकोस. अति विचार करत बसू नकोस. बऱ्याच वेळेला आपली तंद्री लागलेली असते आणि तेवढ्यात कोणी तरी आपल्याला विचलित करते.   असं म्हणतात की माणसाचा मेंदू एका मिनिटात ३८-४५ विचार निर्माण करते म्हणजे दिवसभरात सुमारे ५००००-७०००० विचार. ( Google वर मिळालेला नंबर ) एवढं नक्की की आकडा खूप मोठा आहे. पण सगळ्याच विचारांकडे आपण लक्ष देत नाही. कधीकधी विचारांमध्य...

अशी आई नको ग बाई !!

अशी आई नको ग बाई !! "आई" हा एक शब्द खूप काही सांगून जातो. बाळाला जन्म देण्यासाठी सोसलेल्या कळांपासून ते मुलाला / मुलीला स्वतःच्या पायावर उभे करे पर्यंत घेतलेले कष्ट, आनंद,त्याग सगळंच....  लहानपणी आईशिवाय पान हलत नाही.. मुलांसाठी चांगलं जेवण बनवणं, खेळवण, चांगले संस्कार करणे, वाईट गोष्टींपासून दूर ठेवणे.. जसं जसं मुलं मोठी होतं जातात तसं तसं शाळेचा अभ्यास, पालकसभेला हाजिर राहणं.. आणि एवढं सगळं करून सुध्दा शाळेतून येणाऱ्या सूचना की मुलांकडे लक्ष द्या आणि बरच काही... अश्या अनेक गोष्टी आई सांभाळत असते.  एकीकडे मुलांना शिस्त लावताना स्वतः वाईटपणा घेणं आणि दुसरीकडे घरातल्यांचे विचार मुलांना पटवून द्यायची तडजोड करणं.. घरात कोणाचीही भांडण झाली , अबोला धरला तर "आई" त्यांच्यातल्या संभाषणाचा दुवा असते.  मुलं मोठी होत असताना ती तीच जगणं विसरून जाते... सगळं असून सुध्दा काहीच नसल्याच्या भावना तिला येतात.. पिढ्यांमधलं अंतर आणि विचार खूप जवळून अनुभवणारी, पण काही ठिकाणी हतबल असणारी व्यक्ती म्हणजे "आई".  एक दिवस असा येतो, की जेव्हा आजूबाजूची लोकं म्हणायला लागतात," सोळा...

टाईम प्लीज

टाईम प्लीज... खेळ असुदे किंवा भांडण, वाद विवाद आपला मुद्दा मांडण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे "टाईम प्लीज" म्हणायचं.. नुसतं म्हणायचं नाही तर हाताची मूठ करून ती आपल्या ओठांना लावायची आणि मगच म्हणायचं. इतका दृढ विश्वास होता त्या एका शब्दावर की जणू खरंच वाटायचं साक्षात परमेश्वर सुद्धा आपल्यासाठी तो क्षण धरून ठेवतोय...  लहानपणीचं "टाईम प्लीज" आपल्या आयुष्यात इतक्या आठवणी देऊन जातात, की कधीकधी वाटतं मोठं झाल्यावर हा उपाय रोजच्या आयुष्यात इतक्या सहज वापरायला मिळाला तर जगणं किती सोप्पं होईल.  खरंच असा संवाद साधता आला तर..... भक्त - आहे का वेळ? जरा बोलायचं..  देव - वेळच वेळ आहे ..ये भेटायला....  भक्त -  ( मित्र मैत्रिणींनबरोबर गप्पा चालू होत्या.) तेवढ्यात देवाचं बोलावणं आलं आणि पटकन मुखातून आलं, ए " टाईम प्लीज" हा,.आलोच जरा....  असं म्हणून देवासमोर चर्चा सुरू होणार तेवढ्यात,  देवं म्हणाले कि तू जर सगळ्यांच्या तक्रार करणार असशील तर मी त्या रोज ऐकतो... परत तेच नको..  भक्त -  अरे यार, ह्याला काय अर्थ आहे..म्हणजे खाली कोणाशी बोलू शकत नाही... आणि एवढं " टाईम ...

मध्यांतर

मध्यांतर....  आज खूप दिवसांनी नाटक बघण्याचा योग आला. नाटक म्हटलं की त्यातली पात्र, त्यांचे संवाद आणि कथा ही महत्वाची असतात. कलाकार, जे त्या पात्रांना जिवंत करतात, ते त्या नाटकाची उंची एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात.  पहिली घंटा वाजली.... नाट्यगृहात एक वेगळंच वातावरण होतं. सगळे जण आपापल्या जागेवर एका आशेने बसलेले, काही जण त्यांच्यात्यांचात संवाद साधत होते तर काही जण त्यांच्या लहान मुलांना पॉपकॉर्न, वेफर्स असं सगळं देऊन शांत करत होते. काही आजी आजोबा त्या इवल्याश्या प्रकाशात मोबाईल चा आवाज बंद करून द्या हो असं शेजारील व्यक्तींना सांगत होते. एकंदरीत तिसरी घंटा वाजण्याच्या आधीची गडबड , उत्साह, उत्सुकता असं वातावरण होतं आणि तेवढ्यात, कलाकारांना बघण्याची संधी सोड्याची नाही म्हणून साधारण २-३ इंच असलेल्या मानेला अजून किती उंच नेऊ शकतो असा प्रयत्न करणाऱ्या काही व्यक्ती त्यांचा प्रयत्न करत होत्या. अखेर नाटक सुरू झालं....  वेळ आली ती मध्यांतराची... नाटक, चित्रपट बघण्यामागच एक कारण मध्यंतरात तिथे जाऊन समोसा, वडापाव आणि पॉपकॉर्न खाणं हे पण असतंच. सगळे जण पटापट बाहेर कॅन्टीन जवळ गेले....

मोजमाप आधुनिक विचारांचं

मोजमाप आधुनिक विचारांचं....  आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला आणि सगळ्या आकड्यांना किंमत आणली, त्या किंमतीमुळे माणसांना मोजमाप करणं सोप झालं. आयुष्य जगताना मोजमाप हि सगळीकडे करावी लागते. अगदी जेवण बनवताना मीठ घालण्यापासून ते ताटात किती प्रमाणात भाजी असावी , सॅलड किती असावं इथं पर्यंत, घरामध्ये कोणाचं लग्न असेल तर डाएट करायचं म्हणजे तो ड्रेस / लेहंगा आपल्याला सुंदर दिसेल हे पण मोजमाप चर्चेत आहे. तसंच आपल्या घरातील कुटुंबियांना काय सांगायचं किती सांगायचं ह्याच पण मोजमाप होतंच.   बरं त्या मोजमापाची सवय इतकी झालीये कि माणसांच्या वागणुकीवरून, कपड्यांवरून ठरवतात कि लोकं आधुनिक आहेत कि जुन्या विचारांची.. कपड्यांवरून , ड्रिंक्स केला म्हणून समोरचा व्यक्ती आधुनिक आहे हि व्याख्याच चुकीची आहे. ड्रिंक्स घेणं, कुठले ब्रँडेड कपडे घालायचे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे आणि हे प्रमाण नाही माणसंच मोजमाप करायचं.  पालक जेव्हा मुलांना शिकवणी ला पाठवतात, शाळेत पाठवतात तेव्हा मार्क्स वरून मोजमाप केलं जातं. बऱ्याचदा मुलांना concept किती समजली ते मोजमाप गरजेचं वाटत नाही. कारण प्रमाण मार्क्स दा...

The Millennials

पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धत म्हणजे पुढच्या नवीन पिढीला नावं ठेवणं होय. मग ती नावं उद्धार करण्यासाठी असूदे किंवा कौतुक करण्यासाठी असुदे. हल्ली कानावर पडणाऱ्या पिढ्यांची नावं म्हणजे GenZ, Gen Alpha आणि The Millennials.. एकमेकांना नावं ठेवण्यापेक्षा पिढ्यांना नावं ठेवणं सोप्पं आहे.  बरं ज्यांना माहीत नाही त्यांच्या साठी Millennials म्हणजे १९८१-१९९६ ह्या वर्षात जन्मलेली मुले. GenZ म्हणजे १९९७-२०१२ ह्या वर्षात जन्मलेली मुले आणि Gen Alpha म्हणजे २०१३-२०२५ ह्या वर्षांत जन्मलेली मुले. असा हा सध्या विषय (Trend) चालू आहे.   प्रत्येक पिढी ही नवीन संस्कार आणि जीवनमूल्ये निर्माण करत असते जी त्या वयाला आणि त्या काळाला अनुरूप असतात. पण सध्या बहुचर्चित असलेली पिढी ही Millennials ची आहे. कारण आमच्या डोक्यावर एक हात जुनं ते सोनं ह्यांचा आहे तर आमच्या हातात हात please stop being an old schooler ह्यांचा आहे.. आणि ह्या दोन्ही पिढ्यांमध्ये जवळपास ६० - ७० वर्षांच अंतर आहे.    बरं, millennials ना त्यांची मत मांडणं कधी कधी इतकं कठीण होतं कारण तो समतोल साधताना त्यांच्यावर बाकीच्या दोन...