Posts

Showing posts from June, 2024

अ. वि. उ. वि.

 अ. वि. उ. वि  कितीही सरळ जायचं ठरवलं तरी "विचार" ही अशी गोष्ट आहे जी समोरच्याला द्विधा मनस्थितीत टाकते. सरळ जाणाऱ्याला वाकडी तिकडी वाट घ्यायला भाग पाडते.  "विचार" येताना एकटेच येतात. आपण त्याला विशेषण देतो, "अति विचार आणि"उगाच" विचार आणि सगळं बदलून जातं. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येत असतात की एक छोटीशी गोष्ट असते पण आपण त्याला खूप मोठ् रूप देतो.  सगळेच विचार हे शुल्लक नसतात. काही विचार इतिहास घडवून गेले आहेत.  विचारांवर विजय मिळवणे हे प्रत्येकाला शक्य असते पण तो विजय मिळवताना वेळ किती लागेल हे स्वतः ला निश्चित करावे लागतो. लहान मुलं असुदे किंवा मोठी व्यक्ती असुदे, नेहमीच आपण ऐकत आलोय की उगाच विचार करत बसू नकोस. अति विचार करत बसू नकोस. बऱ्याच वेळेला आपली तंद्री लागलेली असते आणि तेवढ्यात कोणी तरी आपल्याला विचलित करते.   असं म्हणतात की माणसाचा मेंदू एका मिनिटात ३८-४५ विचार निर्माण करते म्हणजे दिवसभरात सुमारे ५००००-७०००० विचार. ( Google वर मिळालेला नंबर ) एवढं नक्की की आकडा खूप मोठा आहे. पण सगळ्याच विचारांकडे आपण लक्ष देत नाही. कधीकधी विचारांमध्य...

अशी आई नको ग बाई !!

अशी आई नको ग बाई !! "आई" हा एक शब्द खूप काही सांगून जातो. बाळाला जन्म देण्यासाठी सोसलेल्या कळांपासून ते मुलाला / मुलीला स्वतःच्या पायावर उभे करे पर्यंत घेतलेले कष्ट, आनंद,त्याग सगळंच....  लहानपणी आईशिवाय पान हलत नाही.. मुलांसाठी चांगलं जेवण बनवणं, खेळवण, चांगले संस्कार करणे, वाईट गोष्टींपासून दूर ठेवणे.. जसं जसं मुलं मोठी होतं जातात तसं तसं शाळेचा अभ्यास, पालकसभेला हाजिर राहणं.. आणि एवढं सगळं करून सुध्दा शाळेतून येणाऱ्या सूचना की मुलांकडे लक्ष द्या आणि बरच काही... अश्या अनेक गोष्टी आई सांभाळत असते.  एकीकडे मुलांना शिस्त लावताना स्वतः वाईटपणा घेणं आणि दुसरीकडे घरातल्यांचे विचार मुलांना पटवून द्यायची तडजोड करणं.. घरात कोणाचीही भांडण झाली , अबोला धरला तर "आई" त्यांच्यातल्या संभाषणाचा दुवा असते.  मुलं मोठी होत असताना ती तीच जगणं विसरून जाते... सगळं असून सुध्दा काहीच नसल्याच्या भावना तिला येतात.. पिढ्यांमधलं अंतर आणि विचार खूप जवळून अनुभवणारी, पण काही ठिकाणी हतबल असणारी व्यक्ती म्हणजे "आई".  एक दिवस असा येतो, की जेव्हा आजूबाजूची लोकं म्हणायला लागतात," सोळा...

टाईम प्लीज

टाईम प्लीज... खेळ असुदे किंवा भांडण, वाद विवाद आपला मुद्दा मांडण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे "टाईम प्लीज" म्हणायचं.. नुसतं म्हणायचं नाही तर हाताची मूठ करून ती आपल्या ओठांना लावायची आणि मगच म्हणायचं. इतका दृढ विश्वास होता त्या एका शब्दावर की जणू खरंच वाटायचं साक्षात परमेश्वर सुद्धा आपल्यासाठी तो क्षण धरून ठेवतोय...  लहानपणीचं "टाईम प्लीज" आपल्या आयुष्यात इतक्या आठवणी देऊन जातात, की कधीकधी वाटतं मोठं झाल्यावर हा उपाय रोजच्या आयुष्यात इतक्या सहज वापरायला मिळाला तर जगणं किती सोप्पं होईल.  खरंच असा संवाद साधता आला तर..... भक्त - आहे का वेळ? जरा बोलायचं..  देव - वेळच वेळ आहे ..ये भेटायला....  भक्त -  ( मित्र मैत्रिणींनबरोबर गप्पा चालू होत्या.) तेवढ्यात देवाचं बोलावणं आलं आणि पटकन मुखातून आलं, ए " टाईम प्लीज" हा,.आलोच जरा....  असं म्हणून देवासमोर चर्चा सुरू होणार तेवढ्यात,  देवं म्हणाले कि तू जर सगळ्यांच्या तक्रार करणार असशील तर मी त्या रोज ऐकतो... परत तेच नको..  भक्त -  अरे यार, ह्याला काय अर्थ आहे..म्हणजे खाली कोणाशी बोलू शकत नाही... आणि एवढं " टाईम ...